
पुणे : ‘‘विदेशात जाणाऱ्यांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. आपल्या देशात देखील अनेक संधी उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा सारे जग भारतीय ज्ञान परंपरेकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे सर्वसमावेशक शिक्षण पद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न नवीन शैक्षणिक धोरणाच्या (एनर्इपी) माध्यमातून आपण करत आहेत,’’ असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.