Rupee Bank : ‘रुपी’च्या उर्वरित ठेवीदारांना ३०० कोटी मिळणार

अवसायनात निघालेल्या रुपी सहकारी बॅंकेच्या ७० हजारांहून अधिक ठेवीदारांना ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) ७०० कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत.
rupee bank
rupee banksakal
Summary

अवसायनात निघालेल्या रुपी सहकारी बॅंकेच्या ७० हजारांहून अधिक ठेवीदारांना ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) ७०० कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत.

पुणे - अवसायनात निघालेल्या रुपी सहकारी बॅंकेच्या ७० हजारांहून अधिक ठेवीदारांना ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) ७०० कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत. उर्वरित ८० हजार ठेवीदारांना ठेवी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठेवीदारांना ३०० कोटींच्या ठेवी परत करण्यात येणार आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून २०१३ मध्ये रुपी बॅंकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले. २०१६ मध्ये चौकशीअंती तत्कालीन १५ संचालकांसह एकूण ६९ जणांविरुद्ध गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावर कलम ८८ नुसार एक हजार ४९० कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार संचालकाच्या जप्त मालमत्तेची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बॅंकेचे प्रशासक आणि ठेवीदारांकडून रुपीचे सक्षम बॅंकेत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न झाले. परंतु अवसायक नेमल्यानंतर रुपी बॅंकेचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे.

ठेव विमा महामंडळाकडून पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांना रकमा देण्याची प्रक्रिया सुरू झाली. बॅंकेचे सुमारे पाच लाख ठेवीदार असून, त्यापैकी ७० हजार ठेवीदारांना ७०० कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. उर्वरित ८० हजार ठेवीदारांना ठेवी परत करण्याबाबत ‘डीआयसीजीसी’कडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ३०० कोटींच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

पाच लाखांपेक्षा अधिक ठेव असलेल्या ठेवीदारांची संख्या सुमारे पाच हजार आहे. त्यापैकी साडेतीन हजार ठेवीदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये परत केले आहेत. उर्वरित दीड हजार ठेवीदारांनी दमडीही घेतलेली नाही. तर, दोनशे, पाचशे रुपये, एक ते १० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांची संख्या साडेतीन लाख आहे, अशी माहिती बॅंकेकडून देण्यात आली.

कर्मचाऱ्यांचे भविष्य अधांतरी

रुपी बॅंकेत सध्या २१० अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. कर्जदारांकडून रक्कम वसूल करण्यासह ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे काम सुरू आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची ही प्रक्रिया सुमारे सहा महिने चालेल. त्यानंतर या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भविष्यात नेमके काय होणार, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि सहकार विभागाला योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे.

ज्या ठेवीदारांनी रक्कम परत मिळण्यासाठी रूपी बँकेकडे अद्याप अर्ज केलेले नाहीत, त्या ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यासाठी ठेव विमा महामंडळाकडून बँकेस पुन्हा सूचना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संबंधित ठेवीदारांनी बॅंकेशी संपर्क साधावा.

- नितीन लोखंडे, सरव्यवस्थापक, रुपी बॅंक.

रुपी बॅंकेची स्थिती (ठेवीदार आणि ठेव रक्कम कंसात)

  • पाच लाखांपर्यंतचे ठेवीदार ४ लाख ८६ हजार ५०८ (७०२ कोटी रुपये)

  • पाच लाखांवरील ठेवीदार ४ हजार ७३१ ( ६०२ कोटी रुपये)

  • दहा हजार रुपयांपर्यंतचे ठेवीदार सुमारे ३ लाख २५ हजार

  • एकूण विमा संरक्षित ठेवी ९४३ कोटी रुपये (त्यापैकी वाटप सुमारे ७०० कोटी)

  • पाच लाखांवरील ठेवी ३६५ कोटी रुपये (विमा संरक्षण नाही)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com