ग्राहकांना त्रास कशाला? महावितरणला झालेले नुकसान 'असे' भरुन काढा!

Mahavitaran
Mahavitaran

पुणे : नवीन सर्व्हिस कनेक्‍शन (वीजजोड) देताना निश्‍चित केलेल्या दरापेक्षा कमी दराने पैसे भरून घेतल्यामुळे महावितरणचे जे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या पगारातून ते वसूल करावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. "कोणत्याही परिस्थितीत ते ग्राहकांकडून वसूल करू नये, असेही मंचाचे म्हणणे आहे. 

नवीन सर्व्हिस कनेक्‍शन देताना 0.5 ते 7.5 किलोवॉट पर्यंत 7 हजार 150 रुपये शुल्क आकारणे आवश्‍यक होते. परंतु महावितरणने 3 हजार 100 रुपये या प्रमाणे शुल्काची आकारणी केली असल्याचे प्रकरण 'सकाळ'ने उघडकीस आणले आहे. त्यामुळे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. 

वेलणकर म्हणाले, "या सर्व प्रकाराचे ऑडिट झाले पाहिजे. नेमके किती नुकसान झाले आहे, यांची माहिती समोर आली पाहिजे. तसेच या प्रकाराला जे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्या पगारातून पैसे वसूल करून हे नुकसान महावितरणने भरून काढावे. त्याचा भार नागरिकांवर टाकू नये. एकीकडे तूट असल्याचे महावितरणकडून दाखविले जाते. दुसरीकडे अशा प्रकारे कारभार होणार असेल, तर त्याला जबाबदार कोण? महावितरणला हे आर्थिक नुकसान परवडणारे नाही. त्यामुळे यांची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com