

पुणे - ‘सध्याच्या शिक्षणपद्धतीतून आपण बुद्धिजिवी समाज निर्माण केला आहे; मात्र सद्-असद् विवेकबुद्धी असणारा समाज आपण निर्माण करू शकलो नाही. विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी शंकराचार्यांनी चार पीठे निर्माण केली, त्याचेही गांभीर्य आपण विसरलो आहोत. आज सत्य आणि असत्य यातील फरक जाणणारा समाज निर्माण करणे गरजेचे आहे.