

Dilip Walse Patil on Maharashtra Service Guarantee Act at Samadhan Shibir in Manchar Ambegaon
Sakal
मंचर : "महाराष्ट्र लोकसेवा हक्क (सेवा हमी) कायद्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख झाले असून, नागरिकांची कामे तत्परतेने व निर्धारित कालमर्यादेत पूर्ण होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे," असे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.