Farmers Crisis : संकटग्रस्त शेतकऱ्यांमुळे यंदाची दिवाळी नाही : शरद पवार

NCP Decides Not to Celebrate Diwali in Solidarity with Flood-Hit Farmers : अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असल्याने त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यंदाची दिवाळी साजरी करणार नाही, अशी घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीमध्ये केली; तसेच त्यांनी राज्य सरकारने दिलेली मदत तोकडी असल्याचे मत व्यक्त केले.
In solidarity with distressed farmers, Sharad Pawar's party opts for 'Black Diwali.'

In solidarity with distressed farmers, Sharad Pawar's party opts for 'Black Diwali.'

Sakal

Updated on

माळेगाव : महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पिकांबरोबर शेत जमीनही वाहून गेली. शेती ही शेतकर्‍याचे सर्वस्व असते. त्यामुळे शेतकरी कमालीचा अस्वस्थ आहे. संकटात सापडलेला शेतकरी अशा मनस्थितीत दिवाळी साजरी करू शकत नाही. त्यांच्या दुखःत आमच्या पक्ष संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत आज स्पष्ट केली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पवार यांनी हा सण साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com