बारामती - राज्याच्या अनेक भागात शेतक-यांचे अतिवृष्टी व पूराने अतोनात नुकसान झाले आहे, या शेतक-यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतक-यांना आर्थिक मदत वितरीत करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. .बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, या नुकसानीमुळे शेतकरी संकटात आहे, राज्य सरकारच्या वतीने या बाबत नेमके काय धोरण जाहीर केले जाते, हे पाहावे लागेल. असे संकट या पूर्वी आलेले नव्हते, त्या मुळे सरकार यात नेमकी काय मदत करणार काय नुकसान भरपाई देणार हे महत्वाच असेल..विदर्भ मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात पिके वाहून गेली असून शेतक-यांचे कंबरडे मोडलेले आहे, अशा स्थितीत त्यांना आर्थिक व इतर बाबतीतही दिलासा देणे गरजेचे आहे. मराठवाडा दुष्काळात असतो यंदा अतिवृष्टीच संकट आहे. सोलापूर व सातारा भागातही काही ठिकाणी नुकसान झालेले आहे.दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन त्यांनाही केंद्राच्या वतीने महाराष्ट्रातील शेतक-यांना अतिरिक्त निधी व भरघोस मदतीची मागणी केली आहे. त्यांच्याकडून लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे..राज्यातील एकूण कृषी क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र पूर व पावसाने संपले आहे, राज्य सरकारकडे अद्यापही नुकसानीची नेमकी आकडेवारी नाही मात्र उपलब्ध माहितीनुसार जवळपास 70 लाख हेक्टरवरील पिक यात नष्ट झाले आहे. हे मोठे संकट आहे, यात शेतक-यांना दिलासा देणे अत्यावश्यक असून तो तातडीने देणे गरजेचे आहे..त्यांच पुर्नवसन कस करायच....ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसानभरपाई देता येईल पण अनेक शेतातील मातीच वाहून गेलेली आहे, त्यांच पुर्नवसन कस करायच हा एक यक्ष प्रश्न आहे. या साठी राज्य सरकारने लवकर भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.