Sharad Pawar
sakal
पुणे - ‘भारतासारख्या शेतीप्रधान देशात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे. ऊस, फळे आणि कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. महाराष्ट्राला डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गेली २५ वर्षे योगदान देणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) आता सरकारमध्ये गुंतवणूक करण्याची ताकद निर्माण करावी’, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.