

Gramdoots undertake water conservation and tree plantation at Shindawane Ghat during Maybhoo Seva Yatra 2026
Sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन : निसर्ग संवर्धनाचा संदेश केवळ शब्दांत न देता प्रत्यक्ष कृतीतून देत शिंदवणे घाट परिसरात महाराष्ट्रभरातील ग्रामदूतांनी अनोख्या पद्धतीने पर्यावरण संवर्धन महोत्सव साजरा केला. मायभू सेवा यात्रा २०२६ अंतर्गत आयोजित या तीन दिवसीय उपक्रमात महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे २४० ग्रामदूतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला.शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान कराड आणि ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन,उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते ९ ऑगस्ट रोजी मायभू सेवा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.