Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरूरमधील सभेत पवार बोलत होते.
sharad pawar
sharad pawarSakal

शिरूर - ‘लोकसभेत गेल्यावर सत्ता आवश्यकच असते, असे नाही. सत्ता नसतानाही कामे करता येतात. फक्त आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जागरुक असावा लागतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ  शिरूरमधील पाच कंदील चौकात झालेल्या सभेत पवार बोलत होते. या वेळी अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन डॉ. कोल्हे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, प्रवीण गायकवाड, अंकुश काकडे, आमदार अशोक पवार, रोहित पवार, उत्तम जानकर, नीतेश कराळे, सुजता पवार, जगन्नाथ शेवाळे, देवदत्त निकम, सुरेश भोर आदी उपस्थित होते.

सत्तेत असल्याशिवाय विकासकामांसाठी निधी मिळत नाही, म्हणून सत्ता आवश्यक असते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सातत्याने सांगितले जाते, असे सांगून शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आज काही लोक सांगतात, लोकसभेत जायचे.

निधी आणायचा आहे. त्यासाठी सत्ता लागते. पण नुसते जाऊन काय उपयोग? आज मला विधानसभा, लोकसभा, राज्यसभा या तीन्ही ठिकाणी जाऊन ५६ वर्षे झाली. चांगले काम करणारा जागरुक असेल, तर निधी मिळतो, ती जागरुकता डॉ. कोल्हे यांच्यामध्ये आहे.’

शरद पवार म्हणाले...

  • विकासाबाबत नेहमी स्वच्छ दृष्टिकोन ठेवून काम केले.

  • एमआयडीसीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला

  • शेती सिंचनासाठी डिंभे, चासकमान धरणातून कालवे काढले

  • आज राज्यातील सर्वाधिक बागायती क्षेत्र शिरूरचे आहे. त्यामुळे शेतकरी प्रपंचात सोन्याचे दिवस

संविधान बदलण्याचा डाव : जयंत पाटील

‘भाजपच्या अनेक खासदारांनी जाहीरपणे संविधान बदलण्याची भूमिका मांडली आहे. त्यांच्या भूमिकेला वाढत्या विरोधामुळे आणि लोकसभेत पराभवाच्या भीतीमुळे भाजपचे नेते आम्ही तसे काही करणार नाही, असे म्हणत असले तरी आपण त्यांच्या भूलथापांना बळी न पडता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान टिकविण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवाराच्याच पाठीशी उभे राहा,’ असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

अजितदादा, तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला नसेल. म्हणूनच तुम्ही आरोप करताय, मी खोटा इतिहास दाखवला. पण पुरोगामी विचार हा कायम व्यवस्थेला प्रश्न विचारत आला आहे. हे प्रश्न विचारले म्हणूनच छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मला जनतेसमोर मांडता आला. पण, तुम्ही जो आरोप केला त्यामुळे शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com