शिवरीचे ग्रामस्थ म्हणताहेत, पालखी महामार्गाची हरकत नोंदणी गावातच व्हावी कारण...

court.jpg
court.jpg

खळद (पुणे) : आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे जमिन भूसंपादनाचे काम होत असताना शिवरी (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्यांची आपल्या हरकती नोंदविण्यासाठी १६ जुलै रोजी पुणे येथे होणारी सुनावणी गावातच व्हावी, अन्यथा ती पुढे ढकलावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे. या रस्त्याचे काम होत असताना शेतकऱ्यांना 3D, 3G च्या नोटीस आलेल्या आहेत. या नोटीसीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आपल्या हरकती नोंदवायच्या आहेत, यासाठी त्यांना उपजिल्हाधिकारी कार्यालय तथा भूसंपादन अधिकारी क्र. २२ पुणे या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पुण्यात सर्वत्र लॉकडाउन आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतकऱ्यांना पुण्यात जाणे शक्य होणार नाही, शासकीय वाहतूक यंत्रणा बंद आहेत. सर्व शेतकऱ्यांच्या कडे स्वतःची वाहने नाहीत, तर कोरोनाच्या भीतीने शेतकरी गाव सोडून बाहेर जाण्याचे टाळत आहे, अशा परिस्थितीत आपली हरकत नोंदविण्यासाठी पुण्यात जाणे शेतकरी बांधवांना शक्य नाही. शासनाने याचा गांभीर्याने विचार करत ही हरकत नोंदविण्याची संधी त्यांना आपल्या गावातच उपलब्ध करून द्यावी, यासाठी येथे सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी व त्यांच्यामार्फत या हरकती स्विकाराव्यात अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात भूसंपादन अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


 "सध्या पुणे शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहणे शक्य होणार नाही. भूसंपादन आधिकारी यांनी हि सुनावणी पुढे ढकलावी अन्यथा तालुक्याच्या ठिकाणी, गावांमध्ये
त्यांनी स्वतः सुनावणी घ्यावी. शेतक-यांची कोंडी करून कोणतीही प्रक्रिया राबविली तर शेतकरी सहकार्य करणार नाही.
 - अमोल बनकर, शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com