

SRPF Recruitment Stayed After Question Paper Copy Row
Esakal
85 Questions Copied Recruitment Process Halted राज्य राखीव पोलीस बलाच्या गट ५, दौंड भरती प्रक्रिया वादात अडकली होती. एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातील एकाच प्रश्नपत्रिकेतून तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे विचारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. इतकंच नव्हे तर प्रश्नांची क्रमवारी आणि पर्यायसुद्धा तसेच होते. यावरून विद्यार्थ्यांसह पालकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. अखेर या भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.