
पुणे : राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी २० बॅंका अडचणीत आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांवर झाला, कर्जपुरवठा बंद झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आता राज्य सहकारी बँकेने थेट विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाहीलाही सुरुवात झाली आहे.