
पुणे - ‘महाराष्ट्र पुढील पाच वर्षांत सर्व क्षेत्रांमध्ये पुढे असेल, देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून राज्याची ओळख निर्माण झालेली असेल. या परिवर्तनाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांचे स्वप्न पुढील पाच वर्षांमध्ये पूर्ण होईल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आश्वस्त केले.