लोणावळा - ‘केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे ऐतिहासिक लोहगड किल्ल्याची बदनामी होत आहे. या चर्चा थांबवल्या जाव्यात,’ अशी मागणी स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे..एका व्यक्तीने कथितपणे केलेल्या गुन्ह्यामुळे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या आणि शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या लोहगड किल्ल्याची प्रतिमा मलीन होऊ नये, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे..या घटनेमुळे राज्यभरातील अनेकांच्या मनात लोहगड किल्ल्याबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. प्रत्यक्षात गुन्हा हा काही व्यक्तींनी केल्याचा आरोप असून, त्याचा संबंध किल्ल्याच्या इतिहासाशी किंवा वारशाशी जोडणे योग्य नसल्याचे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे..किल्ल्याच्या नावापेक्षा आरोपी आणि प्रकरणावर अधिक भाष्य करावे. यामुळे ऐतिहासिक वारशाची प्रतिमा बाधित होणार नाही.- कैलास शेळके, ग्रामस्थ.लोहगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. किल्ल्याचा इतिहास, स्थापत्य हे आकर्षण आहे. अशा स्थळाची ओळख एका गुन्हेगारी घटनेपुरती मर्यादित व्हायला नको.- विनय दाभाडे, इतिहास अभ्यासक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.