महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मुंबईतच उतरविणार; राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन

पुणे जिल्ह्यातील पालकांची व्ही. मुरलीधरन यांच्यासोबत बैठक पार पडली. या नंतर पालकांनी ही माहिती माध्यमांना दिली.
v muraleedharan
v muraleedharansakal
Summary

पुणे जिल्ह्यातील पालकांची व्ही. मुरलीधरन यांच्यासोबत बैठक पार पडली. या नंतर पालकांनी ही माहिती माध्यमांना दिली.

पुणे - युक्रेनमधील सर्व विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, गृह राज्यात परतण्यासाठी राज्य सरकारांनी मदत करावी. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मुंबईतच उतरविणार आहे, असे आश्वासन परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी पालकांना दिले.

पुणे जिल्ह्यातील पालकांची व्ही. मुरलीधरन यांच्यासोबत बैठक पार पडली. या नंतर पालकांनी ही माहिती माध्यमांना दिली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. ऑपरेशन गंगावर आक्षेप घेण्याची गरज नाही. यामध्ये राजकारण करण्याची गरज नसून, सर्व विद्यार्थ्यांना युद्धपातळीवर परत आणत असल्याचे मुरलीधरन म्हणाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधरन म्हणाले, ‘युद्धाची ठिणगी पडण्या आधीच म्हणजे २४ तारखेला ४ हजार विद्यार्थी भारतात परतले आहे. कालपर्यंत दोन हजारपेक्षा अधिक जणांना देशात आणले आहे. पोलंड, हंगेरी आणि शेजारील देशांच्या मदतीने लोकांना भारतात परत आणलं जात आहे. खार्कीव्ह, सूमी या पूर्व भागात अजूनही ७ हजार विद्यार्थी अडकलेले आहेत. खार्कीव्ह सोडण्यासाठी आता सूचना दिल्या आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही विद्यार्थ्यांना आणायला उशीर केलाय हे म्हणणं योग्य नाही. कारण अशा परिस्थितीत मदत करायला नियोजन करावं लागते.’

v muraleedharan
वरिष्ठ अधिकाऱ्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला अत्याचार

मदतीसाठी मंत्री विशेष दूत -

ज्योतिरादित्य सिंधिया बुखारेस्ट, रोमानिया येथे पोहोचले आहेत. तर केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू विशेष दूत म्हणून स्लोव्हाकियात पोहचले आहेत. याशिवाय, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी बुडापेस्ट, हंगेरी येथे पोहोचले. तर जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे पोलंडला पोहचले आहेत. हे चारही नेते भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनमधून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी सरकारमध्ये समन्वय साधण्याचे काम करत असल्याचे मुरलीधरन यांनी सांगितले.

युक्रेनच्या पश्चिमेला जा...

नागरिकांसाठी दूतावासातर्फे मार्गदर्शक सूचना काढल्या जातात. जवळपास चार-पाच दिवसांपासून किव्ह येथे जे भारतीय विद्यार्थी होते. त्यांना आता किव्ह सोडणेच उचित ठरेल. युक्रेनच्या पश्चिम भागाकडे त्यांनी गेलं पाहिजे., असे मुरलीधरन म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com