पुणे - पुणे शहरात आज किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. शहरात ४ हजार ११ ईव्हीएमचा वापर केला होता. मशिन खराब होण्याचे प्रमाण हे साधारणतः दोन टक्क्यांपर्यंत असते. पण, पुण्यात हे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे..कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण दिल्याने मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदारयादीतील मानवी चुका या यापूर्वीही होत्या, पण आमचा प्रयत्न बोगस मतदान रोखण्याचा होता, त्यात यश आले, असा दावा आयुक्त नवलकिशोर राम यांनी केला आहे..महापालिकेच्या निवडणुकीत आज मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचे समोर आले. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे हे भिन्न मतदान केंद्रावर होते. अनेकांचे केंद्र हे घरापासून खूप लांब असल्याने मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. तसेच बोगस मतदान, ईव्हीएम खराब होणे अशा तक्रारी आल्या. त्यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांनी त्यांची बाजू मांडली..या मतदानामध्ये बोगस मतदान होऊ नये, दुबार तिबार ज्यांचे नाव आहे, त्यांनी एकाच ठिकाणी मतदान करावे यासाठी आमचे प्रयत्न होते. आज त्यावरच आमचे लक्ष होते. बोगस मतदान झाल्याची एक तक्रार प्राप्त झाली होती, पण त्यातही काय तथ्य नव्हते. मतदार याद्यांची विभागणी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय अशा दोन टप्प्यात होते..ती नंतर निवडणूक आयोगाकडे पाठवून त्यास मान्यता घेतली जाते. पत्ता व्यवस्थित नसल्यानेही समस्या निर्माण होते. मतदार यादीतील समस्या ही प्रत्येक निवडणुकीत असते, त्यात मानवी चुका झालेल्या असतात. त्यामुळे या चुका केवळ महापालिका निवडणुकीतच होतात असे नाही.ज्या मतदारांची नावे एकपेक्षा जास्त ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून बोगस मतदान होऊ नये, याची काळजी आम्ही घेतली. आमच्या यंत्रणेने शांततेमध्ये मतदानाची यंत्रणा पार पाडली आहे, असे नवल किशोर राम यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.