सोमेश्वरनगर - पुणे जिल्ह्याचा गाळप हंगाम अत्यंत वेगाने सुरू असून, अधिकाधिक गाळपासाठी कारखाने आटापिटा करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. ४६ लाख ३४ हजार क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे..गतहंगामापेक्षा साखर उतारा अर्ध्या टक्क्यांनी अधिक आहे. उताऱ्यात ‘सोमेश्वर’ने अन्य कारखान्यांना खूप मागे टाकले आहे. तर गाळपात अवघ्या पन्नास दिवसात ‘बारामती अॅग्रो’ने तब्बल १० लाख टनांचा तर ‘दौंड शुगर’ने नऊ लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे..पुणे जिल्ह्यातील अठरापैकी ‘घोडगंगा’, ‘राजगड’ आणि ‘यशवंत’ हे तीन कारखाने बंद आहेत. ओंकार ग्रुपने ‘कर्मयोगी’ सहयोगी तत्त्वावर तर ‘अनुराज’ची मालकी हक्काने चालवण्यास घेतला आहे. त्यांची आकडेवारी मिळू शकली नाही. उर्वरित तेरा कारखान्यांनी २१ नोव्हेंबरपर्यंत ५३ लाख ५७ हजार ६४७ टनांचे गाळप केले आहे..सरासरी साखर उतारा ८.६५ टक्के इतका आहे. गतहंगामात तो याच दिवसात ८.१६ टक्के इतका होता. जिल्ह्यातील आठ सहकारी कारखान्यांचा उतारा तब्बल ९.८९ टक्के इतका समाधानकारक आहे. तर पाच खासगी कारखान्यांचा ७.४७ टक्के इतका आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.