'टेमघर' झाले ओव्हर फ्लो; ऑक्टोबर महिन्यात धरण भरण्याची पहिलीच वेळ

'टेमघर' झाले ओव्हर फ्लो; ऑक्टोबर महिन्यात धरण भरण्याची पहिलीच वेळ

पिरंगुट : पुणे शहराची तहान भागविणारे आणि वरदान ठरलेले मुठा खोऱ्यातील टेमघर धरण नुकतेच पूर्ण क्षमतेने भरले असून  'ओव्हर फ्लो' झाले आहे. या धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस धरण भरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आज या धरणामध्ये ३.७१ टीएमसी म्हणजेच १०० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी या धरण क्षेत्रात ३३०० मीमी पाऊस झाल्यावर  हे धरण ५ ऑगस्ट रोजी भरले होते. मात्र त्यावेळी गळतीमुळे ग्राऊटिंगच्या कामासाठी या धरणाचे पाणी ऐन दिवाळीच्या आसपास सोडून द्यावे लागले होते. यंदा मात्र पाटबंधारे विभागाच्या दाव्यानुसार, या धरणाची गळती ९५ टक्के थांबली आहे. या हंगामात धरण परिसरात आजपर्यंत एकूण ३०८९ मिमी इतका पाऊस झाला आहे. 

२०१३ या वर्षात २५७५ मिमि इतका पाऊस होताच ३ ऑगस्ट रोजी हे धरण शंभर टक्के भरले होते. सन २०१४ मध्ये या धरण परिसरात २८०७ मिलिमिटर पाऊस होताच, हे धरण ५ सप्टेंबर रोजी पूर्ण भरले होते. त्यानंतर गळतीचे प्रमाण मोठे असल्याने २०१४ ते २०१८ या कालावधीत या धरणाच्या ग्राउटिंगच्या 
कामासाठी सलग चार वर्षे पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही.

त्यामुळे गेल्यावर्षी सुमारे ९५ टक्के गळती थांबल्यामुळे या धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने साठवू लागल्याने  ५ ऑगस्ट रोजी हे धरण शंभर टक्के भरले होते. यावर्षी मात्र पावसाने साथ देऊनही आणि ऑक्टोबर महिना संपत आला तरी हे धरण शंभर टक्के  न भरल्याने हे धरण शंभर टक्के भरणार की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र आज सकाळी या धरणात पुरेसा पाणी साठा झाल्याने ते शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे यंदा या 
धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा झाल्याने पुणेकरांसह शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०७.९६ दशलक्ष घनमीटर(३.६४ टीएमसी) आहे. उपयुक्त साठ्याची क्षमता १०५.०१ दलघमी (३.७१ टीएमसी) आहे. सन २०१० मध्ये दहा मीटरने या धरणाची उंची वाढविण्यात आल्याने पाण्याची साठवण क्षमताही दीड टीएमसीने वाढली आहे. टेमघर प्रकल्प उपविभाग क्रमांक २ चे उपअभियंता एच.जी. जाधव म्हणाले, ''अद्यापही या धरणाची उर्वरित ५ टक्के गळती थांबण्यासाठी यावर्षीही ग्राउटिंगचे काम हाती घ्यावे लागणार आहे.'' 

दरम्यान, हे धरण भरले तरी धरणग्रस्तांच्या समस्या मात्र तशाच प्रलंबित आहेत. त्यामुळे शासनाने धरणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे तसेच अन्य़ समस्या सोडवाव्यात, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची वाट पाहू नये, असाही इशारा धरणग्रस्तांनी दिला 
आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com