
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ (टेट)’ परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. राज्यातील एकूण दोन लाख ११ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर, परीक्षेत व्यावसायिक अर्हता, त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक आणि अन्य वैध प्रमाणपत्र सादर न केलेल्या जवळपास सहा हजार ३२० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवल्याचे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.