
पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आरक्षित २५ टक्के जागांमधून प्रवेश मिळावा, यासाठी पुणे जिल्ह्यातून तब्बल ५९ हजार ६८५ अर्ज आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी ‘आरटीई’ प्रवेशासाठी नर्सरीऐवजी थेट पहिलीतून प्रवेश देण्याची चलाखी केली. १७ हजार ५७ जागा असल्या तरी फक्त १ हजार ४१५ जागाच नर्सरीपासून उपलब्ध झाल्या असल्याने कायद्याच्या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यात राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात ९७२ शाळांमध्ये १७ हजार ५७ जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी शेवटच्या दिवशी शनिवारी रात्री ९ पर्यंत ५९ हजार ६८५ पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
एकीकडे अर्जांसाठी जागांच्या तिपटीपेक्षा जास्त अर्ज आलेले असले तरी ९३ टक्के शाळांनी नर्सरी व केजी स्तरावरून प्रवेश दिलेले नाहीत. १५ हजार ६३८ जागांवर पहिलीत प्रवेश दिला जाईल, तर १ हजार ४१५ जागांवरच नर्सरी किंवा केजी स्तरावरून प्रवेश मिळणार आहे, त्यामुळे आर्थिक दुर्बलता असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळणार नाहीत, तसेच पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी पहिलीला मोठ्या शाळेत जातो, तेव्हा त्याला त्या मुलांच्या तुलनेत काहीच येत नसते. यातून त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो, असे ‘आप’चे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
शिक्षण अधिकारी सुनील कुऱ्हाडे म्हणाले, ‘‘शनिवारी रात्री प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आहे, त्यास मुदतवाढ देण्यासाठी अद्याप संचालक कार्यालयाकडून सूचना आलेली नाही. आरटीआय प्रवेशासाठी एंट्री पॉइंट ठरविण्याचा अधिकार शाळांना आहे. न्यायालयाचा निर्णय संबंधित केसपुरता मर्यादित असेल, तो सर्वांना लागू नाही.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.