Sharad Pawar : संतांचे विचार पोहोचविण्याचे काम वारीतून

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिंपळी येथील संविधान समता दिंडीत सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधला.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

बारामती - ‘हल्लीच्या काळातील रस्ते काँक्रीट व डांबराचे झाले आहेत; पण पूर्वीच्या काळात असे रस्ते नव्हते. काट्यांतून, दगड-धोंड्यांतून माझा वारकरी पंढरीच्या दर्शनासाठी आस्थेने अखंडपणाने युगानयुगापासून चालत जात आहे. हे आपण अनेक वर्षांपासून पाहतो आणि ऐकतो. ती परंपरा आजही कायम टिकून आहे. संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम वारीतून होत आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिंपळी येथील संविधान समता दिंडीत सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, तुषार गांधी, युगेंद्र पवार, वनिता बनकर, पौर्णिमा तावरे, श्यामसुंदर महाराज, बापूसाहेब मोरे, अॅड. एस. एन. जगताप, अॅड. संदीप गुजर, सत्यव्रत काळे आदी उपस्थित होते. श्यामसुंदर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडला.

पवार म्हणाले, ‘कण्हेरीला मारुतीरायाच्या मंदिरात अखंड विडा घेऊन मार्गदर्शन करण्यासंबंधीची भूमिका अनेक लोक घेतात. एस. पी. कॉलेजला सोनोपंत दांडेकर नावाचे एक शिक्षक होते. दर शनिवार-रविवारी त्यांचे वास्तव्य कण्हेरीला असायचे. त्या वास्तव्यामध्ये संत शिकवणीचा विचार जनमानसांमध्ये पोहोचविण्याचे काम ते अखंडपणे करायचे.

ही गोष्ट अलीकडच्या काळातली आहे. शेकडो वर्षांपूर्वीपासून हा माणुसकीचा संदेश वारीच्या माध्यमातून अखंडपणाने केला जातो. कोण कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या वंशाचा याचा विचार वारीत कधीही नसतो. आनंद हा आहे की, अलीकडच्या काळामध्ये समाजातील सुशिक्षित लोक, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे लोक, हे सुद्धा वारीमध्ये सहभागी व्हायला लागले.

संतश्रेष्ठांचा हा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने काही ना काहीतरी हातभार लावण्याचे काम आजच्या काळामध्ये ते करत आहेत. हा विचार महाराष्ट्र पुरता सीमित नाही, तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. याप्रसंगी तुषार गांधी, श्यामसुंदर महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

‘पालखी राजकीय विषय नाही’

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘गेली १८ वर्षे मी पालखीत चालते, यंदा दिवे घाटाची पालखी चुकली; पण नंतर मी सहभागी झाले. पालखी हा आमच्यासाठी काही राजकीय विषय नाही, तो आस्थेचा विषय आहे. पांडुरंग एकच असा देव आहे की जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी तुम्हाला दर्शन द्यायला येतो.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.