पदाधिकाऱ्यांच्या चिकाटीमुळे गावचा विकास शक्य : संग्राम थोपटे

पदाधिकाऱ्यांच्या चिकाटीमुळे गावचा विकास शक्य : संग्राम थोपटे

भुकूम, ता. ३० : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चिकाटी धरून पाठपुरावा केल्यास गावाचा विकास निश्चित होतो. विविध योजना राबविणे शक्य होते असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
भुकूम (ता. मुळशी) येथे सव्वाकोटी रुपये विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपसभापती भानुदास पानसरे, तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, संजय उभे, सुरेश निकाळजे, सुरेश पारखी, दिग्विजय हुलावळे, शिवाजी तांगडे, राहुल शेडगे, तुषार माझीरे, सरपंच रेखा वाघ, उपसरपंच सचिन हगवणे, सचिन आंग्रे, नीलेश ननावरे, सुवर्णा आंग्रे, गौरी भरतवंश, मयूरी अभिलाष आमले, सुवर्णा पानसरे, भागवत यादव उपस्थित होते.
थोपटे म्हणाले भुकूमसाठी सचिन आंग्रे व सचिन हगवणे यांनी विशेष पुढाकार घेतला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास सहकार्य करू. स्वबळावर झाल्यास प्रत्येक गट-गणात पक्षाचे कार्यकर्ते केलेल्या कामाच्या जोरावर पूर्ण ताकदीनिशी उतरतील असे सांगितले. पानसरे म्हणाले, आमदारांनी भुकूमसाठी मोठा निधी दिला त्यामुळे त्यांच्या पाठीशी कायम राहू. यावेळी थोपटे व पानसरे यांच्यात मार्मिक जुगलबंदी झाली. थोपटे म्हणाले पानसरे यांनी निधी मागितल्यावर निधी दिला. आगामी निवडणुकीत मतदानात आघाडी देऊन खरे आभार मानावे. पानसरे यांनी ज्वारी पेरल्यावर ज्वारीच उगवेल त्याची काळजी करू नका असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com