धामणे पूल पाण्याखाली
आंबेठाण, ता. २८ : भामा आसखेड (ता. खेड) धरणातून भामा नदीपात्रात चालू वर्षाच्या हंगामातील सर्वात मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे. १३ हजार ३१२ क्यूसेकने हे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने करंजविहिरे ते धामणे या दोन्ही गावादरम्यान असणाऱ्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला आहे.
भामा आसखेड धरणाच्या चारही दरवाजांतून विसर्ग सुरू असून, त्यासाठी धरणाचे दरवाजे १२० सेंटीमीटरने उचलण्यात आले आहेत. शनिवारी (ता. २७) रात्रीपासून धरणातून ९५७४ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. त्यात वाढ करून हा विसर्ग रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून १३ हजार ३१२ क्यूसेक केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.