‘भामा आसखेड’मधून 
रब्बीचे पहिले आवर्तन

‘भामा आसखेड’मधून रब्बीचे पहिले आवर्तन

Published on

आंबेठाण, ता. १५ : भामा आसखेड (ता. खेड) धरणातून या वर्षीच्या रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोमवारी (ता. १५) सोडण्यात आले. धरणाच्या चारही दरवाजांतून ११०० क्यूसेकने हे पाणी सोडण्यात आले. त्यासाठी धरणाचे चारही दरवाजे १० सेंमीने वर उचलण्यात आले आहे.
त्यातून खेड तालुक्यातील सिद्धेगव्हाणपर्यंत असणारे जवळपास दहा बंधारे या आवर्तनातून भरले जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील आणि या पाण्यावर पाणी योजना अवलंबून असणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भामा आसखेड धरण हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भामा नदीवर उभारले असून, धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे. सध्या धरणात ९४.१२ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ८४.३१ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी पुरेसा पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. यावर्षी १२०३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सहाय्यक अभियंता (श्रेणी १) अश्विन पवार, शाखा अभियंता शुभम सुसुंद्रे, संदीप भोसले, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com