आळंदीत उद्या २७०० विद्यार्थी म्हणणार पसायदान

आळंदीत उद्या २७०० विद्यार्थी म्हणणार पसायदान

Published on

आळंदी, ता. १३ : संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव वर्षानिमित्त आळंदी नगरपरिषदेच्या वतीने पाचही शाळांमध्ये गुरुवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजता ध्वजवंदन आणि तिरंगा फेरी होणार आहे. त्यानंतर पाचही शाळांमधील २७०० विद्यार्थी एकाच वेळी पसायदान म्हणणार आहेत.
याबाबत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्‍वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव (७५०) जन्मोत्सव वर्ष शुक्रवारी (ता. १५) गोकूळ अष्टमी दिवशी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये साजरा करण्याचे निर्देश शासनाच्या नगर विकास विभागाने काढले आहेत. त्यानंतर आता गुरुवारी सर्व शाळांमध्ये माउलींचे पसायदान म्हणण्याबाबतचा आदेश शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी शालेय व क्रीडा विभागाकडून दोन आठवड्यांपूर्वी काढले. या निमित्ताने गुरुवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजता आळंदी नगरपरिषदेच्या पाच शाळांतील २७०० विद्यार्थी ध्वजवंदन आणि तिरंगा फेरी काढतील. ही तिरंगा रॅली प्रत्येक शाळांच्या विभागवार त्या त्या परिसरामध्ये काढण्यात येणार आहे. वाहतूक आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने ही सुरक्षा घेण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी कवायत करतील. कवायत झाल्यानंतर सर्व विद्यार्थी शाळांमध्ये एकाच वेळी पसायदान म्हणणार आहेत. यावेळी माउलींच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. शाळांमध्ये प्रवेशद्वारात रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com