आळंदीत दोघा रिक्षाचालकांवर कारवाई

आळंदीत दोघा रिक्षाचालकांवर कारवाई

Published on

आळंदी, ता. १० : वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने अरुंद पुलावर रिक्षा उभी केली याप्रकरणी दोघा रिक्षा चालकांवर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ९) आळंदीतील नगरपरिषद चौकात इंद्रायणी पुलावर घडली.
उत्तम अप्पा पाटोळे (रा. हनुमान वाडी केळगाव), श्याम पंजाबराव लसणापुरे (रा. लक्ष्मी नगर मोशी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षाचालकांचे नाव आहे. तर सुनीता गुणाजी कौटे आणि रीना अतुल नायकोडी या वाहतूक विभाग महिला पोलिसांनी फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम पाटोळे यांनी त्यांच्याकडील रिक्षा (एमएच १४, केयू ९९५७) आणि श्याम लसणापुरे यांनी त्यांच्याकडील रिक्षा (एमएच १२ क्यूआर ५३४६) नगरपरिषद चौकातील इंद्रायणी पुलावरती सार्वजनिक मार्गावरून ये-जा करणाऱ्या व्यक्तींना अटकाव होईल, अशा स्थितीत उभी केली होती. परिणामी रहदारीस अडथळा होत होता म्हणून दोन्ही रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com