वारकरी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा

वारकरी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा

Published on

आळंदी, ता. १६ : ‘‘शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना बहुतांश ठिकाणी करावा लागला. हाता तोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक गेले. उगवलेले गेले तर पुढे जाऊन पेरायचे काय असा प्रश्‍न आहे.’’ अशा भावना व्यक्त केल्या बीड जिल्ह्यातील रामदास रूपनवर या वारकऱ्यानी.
कार्तिक वारीसाठी यंदा वारकऱ्यांची संख्या कमी जाणवली. खास करून मराठवाडा, खानदेश भागातील वारकऱ्यांची संख्या तुलनेत कमी होती. त्यासंदर्भात वारकऱ्यांशी चर्चा केली असता त्यातील शेतकरी वारकरी ‘सकाळ’च्या प्रतिनिधींसमवेत व्यक्त झाले. वारकरी शेतकरी म्हणाले, ‘‘पाऊस झाला आणि शेतीचे होत्याचे नव्हते झाले. काही ठिकाणी रब्बी हंगामाची पेरणी झाली नाही, हे मराठवाड्यातले चित्र. तर पुणे जिल्ह्यातील मावळ आणि कोकण भागामध्ये भाताची कापणी झाली नाही. परिणामी वारीतील संख्या रोडावली.’’ सरकार विविध योजना राबवत आहे. परंतु त्यांनी शेतकऱ्यांच्या संकटकाळासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
जामनेर मधील जीवन रजपूत म्हणाले, ‘‘पाऊस फार झाल्याचा कापसाच्या पिकावर परिणाम झाला. शेतीतील मातीही वाहून गेली.’’ पालघर जिल्ह्यातील ज्ञानेश्‍वर जागरे यांनी सांगितले की, भात कापणीला आला होता मात्र पाऊस जास्त झाल्याने सध्या कापणी उशिरा लांबली. घरातील एक दोन माणूसच वारीला आलो बाकी घरी शेतीची कामे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com