आळंदी गावठाणात तीन दिवस नाही पाणी
आळंदी, ता. २३ : निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन व्यस्त असल्याने माऊली मंदिर परिसरात तब्ब्ल तीन दिवस बंद नळाला पाणी आले नाही. यामुळे आळंदी गावठाणातील नागरिकांची पाण्यावाचून गैरसोय सहन करावी लागली. आळंदी नगर परिषद हद्दीतील गावठाण भागातील मंदिर परिसर, चावडी चौक, पालिका चौक भागात शनिवारी (ता. २०) नगर परिषदने पाणी पुरवठा केला होता. यानंतर दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवस झाले नाही. गावठाणात व्यापारी, नागरी वस्ती आणि मंगल कार्यालय असून ते पूर्णपणे पालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत. रविवारी (ता. २१) मतमोजणी असल्याने प्रशासन व्यस्त होते. मात्र, किमान आज सकाळी तरी पाणी सोडणे गरजेचे होते. पालिकेत याबाबत विचारणा केली असता उडवाउडवाची उत्तरे दिली जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

