कीटकनाशकामुळे शेतकऱ्याचा मृत्यू
आळंदी, ता. १० : शेतामध्ये फवारणी करताना कीटकनाशक नाका तोंडात गेल्याने गोलेगाव (ता. खेड) येथील गणेश बबन चौधरी (वय ४३) या शेतकऱ्याचा २४ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. ९) आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली आहे.
याबाबत आळंदी पोलिसांनी माहिती दिली की, ७ डिसेंबर रोजी गणेश चौधरी हे शेतात कीटकनाशक फवारणी करत होते. त्यांनतर त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. १४ डिसेंबर रोजी अतिदक्षता विभागात नेले. मात्र, उपचारासाठी प्रतिसाद न दिल्याने २४ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने घोषित केले. याबाबतची खबर पुणे शास्त्रीनगर येथील सह्याद्री रुग्णालयाचे डॉ. सचिन चव्हाण यांनी दिली. त्यांनतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

