ओला दुष्काळ जाहीर करण्याची मुळशीतील शेतकऱ्यांची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मुळशीतील शेतकऱ्यांची मागणी

Published on

भुकूम, ता.२८ : मुळशी तालुक्यात मे महिन्यापासून पावसाची उघडीप मिळाली नाही. त्यामुळे भात रोपांची पेरणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली रोपे पावसाने कुजून गेली आहेत. सोयाबीन पिकाची अवस्था अशीच झाली. पाऊस अद्याप उघडत नाही, त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्याच्या मे महिन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे खाचरांना उपळे फुटले. शेतकरी सात जूनपासून भात पेरणी करतात. खाचरातील पाणी व सतत पडणारा पाऊस यामुळे पेरणी होऊ शकली नाही. थोडी उघडीप मिळताच काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. दरम्यान, बारा जूनपासून पुन्हा जोरदार पाऊस झाला तो अद्याप उघडला नाही. त्यामुळे उगवलेली भात रोपे कुजून गेली असे घोटावडे येथील शेतकरी तात्यासाहेब देवकर यांनी सांगितले. तसेच पेरलेले सोयाबीन कुजून गेल्याचे रूपेश भेगडे यांनी सांगितले. खाचरातील पाण्यामुळे कोणतेही पीक घेऊ शकत नाही. बांधावरील तूर, पावटा, मिरचीची पिके पेरणी करता येणार नाही त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे असे खारवडे येथील शेतकरी शंकर मारणे व रामभाऊ ढेबे यांनी सांगितले.
दरम्यान, पावसाळ्यातील मशागतीची कामे मिळू शकली नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टर, जेसीबी व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. आंबा, जांभूळ, फणस फळबागांचे उत्पादन शेतकऱ्यांनी मिळू शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्ण आर्थिक अडचणीत सापडला आहे.
02564

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com