आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो

आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो

Published on

चास, ता.१८ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदीपात्रात होण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी धरण ११ जुलै रोजी शंभर टक्के भरले होते. मात्र, या वर्षी धरण सहा दिवस उशिरा म्हणजे १७ जुलै रोजी भरले आहे. आता धरणात १.५१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
चास कमान धरणाच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या खेड तालुक्यातील गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगांव पठार भागास वरदान ठरणारे हे धरण सोमवारी (ता.१७) रात्री अकरावाजून वीस मिनीटांनी पूर्ण क्षमतेने भरताच धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. या धरणात २०१० पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरुवातझाली असून, पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. धरण भरताच सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. कळमोडी धरण परिसरात पावसाचा जोर गेली आठ दिवसांपासून वाढला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाव व परिसरात पावसाचा जोर चांगला राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन धरण शंभर टक्के भरले. धरणाच्या सांडव्यावरून २११ क्युसेक्स वेगाने पाणी आरळा नदीपात्रात विसर्ग होत असून पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वेगाने होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

धरण पातळीवर उप विभागीय अभियंता डी. एस. डिग्गीकर, सहायक अभियंता एस. एस. सुसुंद्रे, कर्मचारी रोहिदास नाईकडे, संभाजी बोंबले, शांताराम सातपुते चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.मागील वर्षी धरण भरण्यासाठी ११ जुलै हा दिवस उजाडला होता चालू वर्षी १७ जुलै हा दिवस उजाडला म्हणजे सहा दिवस उशिरा कळमोडी धरण भरले. धरण परिसरात एक जुनपासून ४२८ मिली. पावसाची नोंद करण्यात आली आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चास कमान धरणात येत असल्याने चास कमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.

चिखलगांव, साकुर्डी देवोशी, कुडे, योणिये, बांगरवाडी या गावांना या धरणाच्या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होत असून पश्चिम भागातील अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना ह्या कळमोडी प्रकल्पावर अवलंबून असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने सुटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सहा दिवस धरण उशिरा भरले असून पावसामुळे भयभीत झालेल्या शेतकरी वर्गाला समाधान झाले आहे.
- बाळासाहेब गोपाळे, अध्यक्ष, कळमोडी प्रकल्प संघ समिती

01119

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.