चास कमान धरणात शंभर टक्के साठा
चास, ता.२३ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे चास कमान धरणात मंगळवारी (ता. २३) शंभर टक्के पाणीसाठा झालाआहे. धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे पाचही दरवाजे सकाळी ७.३० वाजता उघडण्यात आले. त्यातून १८६० क्यूसेक वेगाने भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडला आहे. अशी माहिती धरण प्रशासनाच्या वतीने सहाय्यक अभियंता एस. एस. सुसुंद्रे यांच्याकडून देण्यात आली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने सर्वप्रथम नऊ सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग थांबविला होता. त्यानंतर धरणातून होणारा सर्वप्रकारचा विसर्ग १५ सप्टेंबर रोजी बंद केला होता. मात्र, सोमवारी (ता. २२) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग वाढल्याने मंगळवारी (ता. २३) धरणाचे पाचही दरवाजे १० सें.मी. उघडून नदीपात्रात विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली.
Associated Media 03877Ids : CHS25B03877
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.