ई-पीक नोंदणी न केल्यास पीक कर्ज मिळणार नाही

ई-पीक नोंदणी न केल्यास पीक कर्ज मिळणार नाही

Published on

घोडेगाव, ता. १६ : खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील ई-पीक नोंदणीची मुदत वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना २० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ई-पीक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीककर्ज, अल्प व दीर्घ मुदत कर्ज मिळणार नाही किंवा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा इशारा तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिला आहे.
ई-पीक पाहणी डीसीएस मोबाइल अॅपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी एक ऑगस्टपासून सुरू झाली आहे. सर्व शेतकरी बांधवांना आपण आपल्या मालकीच्या शेतजमिनींमध्ये खरीप म्हणजे पावसाळी हंगामा जी काही पिके घेतली आहेत. त्यांची नोंदणी आपल्या ७/१२ वर दिलेल्या मुदतीत करून घ्यावी. सलग तीन हंगाम म्हणजे खरीप हंगाम, (पावसाळी), रब्बी हंगाम (हिवाळी) व उन्हाळी हंगामामध्ये जर आपले ७/१२ वरील पीकपाहणी हे सदर कोरे राहिले तर तिथे ‘कायमपड’ दाखल होईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे, शेतजमिनीचे नुकसान झाल्यास कायमपड लागल्याने ती पंचनामा व नुकसान भरपाई देण्यास पात्र ठरत नाही. त्यामुळे लवकरात लवकर पीकपाहणी करून घ्यावी, असे आवाहन नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ आणि आंबेगाव तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com