सुरक्षित, सुलभ प्रवासासाठी रस्त्यांची कामे मार्गी लावा

सुरक्षित, सुलभ प्रवासासाठी रस्त्यांची कामे मार्गी लावा

Published on

घोडेगाव, ता. २७ : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे कुंभमेळा २०२७ गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा अंतर्गत विकास आराखड्यातील कामे वेळेत व दर्जेदार करून पूर्ण होणे आवश्यक आहे. भक्तांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावा, अशी सूचना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७-गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा) तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संबंधित कामांबाबत आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह आमदार बाबाजी काळे, शरद सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, मुख्य वनसंरक्षक विवेक होशीग, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सार्वजनिक कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, श्रुती नाईक, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, उदय गावंदे, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, माजी सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप, संदीप चपटे, प्रवीण पारधी आदी पदाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या राजगुरुनगर–तळेघर–भीमाशंकर तसेच बनकर फाटा–जुन्नर–घोडेगाव–तळेघर या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला जात असून त्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या अनेक तक्रारी आणि अडचणी गंभीर आहेत. या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे गेले असले तरी आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. ज्यामुळे रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांचा सतत येणारा तक्रारींचा ओघ लक्षात घेता संबंधित विभागांनी तीनही तालुक्यांतील आमदारांसमोर सादरीकरण करून तातडीने अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. हा रस्ता तातडीने दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे, असा ठाम आग्रह बैठकीत करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाने कठोर नियंत्रण ठेवावे
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील सर्व अडचणी आणि समस्या तातडीने दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कठोर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी आमदारांनी केली. भीमाशंकर विकास आराखड्यातील कामे वेळेत पूर्ण होणे हेच यावरचा मुख्य उपाय आहे, याकडे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विशेष लक्ष वेधले. भक्तांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी हे काम लवकरात लवकर मार्गी लागणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com