दुष्काळी निधीच्या लाभासाठी केवायसी करा : जगताप 
दुष्काळी निधीच्या लाभासाठी केवायसी करा : जगताप यांचे

दुष्काळी निधीच्या लाभासाठी केवायसी करा : जगताप दुष्काळी निधीच्या लाभासाठी केवायसी करा : जगताप यांचे

सासवड शहर, ता ४ : ‘‘पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, संगणक कर्मचारी यांना भेटून आपली नोंद झाली का नाही ते पाहावे. तसेच बँक खात्याची केवायसी करून घ्यावी,’’ असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथे झालेल्या कार्यक्रमात जगताप म्हणाले की, तालुक्यातील ५६ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटी ५६ लाख रुपयांचा दुष्काळी निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केले नाही. यामुळे निधीची रक्कम बँक खात्यात वर्ग होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नोंद झाली की नाही ते तपासून घ्यावे.
पुरंदर तालुक्यातील जिराईत क्षेत्र २१ हजार २९६.४ हेक्टर इतके असून, शेतकऱ्यांची संख्या ३१ हजार १२० इतकी आहे. प्रती हेक्टर ८५०० याप्रमाणे १८ कोटी १० लाख १९ हजार ४०० रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. तसेच बागाईत क्षेत्र ४ हजार ८०० हेक्टर असून शेतकऱ्यांची संख्या १३ हजार ४८० इतकी आहे. यासाठी प्रतिहेक्टर १७ हजार रुपये याप्रमाणे ८ कोटी १६ लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. बहुवार्षिक क्षेत्र ३६९१.६९ हेक्टर आहे तर ११ हजार ४०० इतकी शेतकऱ्यांची संख्या असून प्रतिहेक्टर २२ हजार ५०० रुपये प्रमाणे ८ कोटी ३० लाख ६३ हजार अनुदान येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

यंदा खरीप, रब्बी हंगाम वाया गेला असून अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावोगावी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अद्याप ५६ हजार शेतकऱ्यांची नोंद असली तरी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचून त्यांची नोंद घेतली जाईल. त्यांना सर्वांना लाभ दिला जाईल.
- संजय जगताप, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com