बाजरी, सोयाबीन मोजतिये अंतिम घटका
गुनाट, ता. २७ : करडे, निमोणे परिसरात सततच्या पावसामुळे व हवामानातील बदलामुळे कांदा, टॉमेटो पिकांवर बुरशीजन्य रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर काढणीला आलेली बाजरी आणि सोयाबीन पावसामुळे शेतातच अंतिम घटका मोजत आहे. परिणामी खरीप हंगामातील पिके धोक्यात आल्याने शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक नुकसानीचे संकट उभे राहणार आहे.
रोगराईचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर पावसामुळे औषध फवारणीही करता येत नाही. काढणीला आलेले बाजरी पीक पावसामुळे शेतातच उभे आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या कांद्याच्या रोपवाटिका ही बुरशीजन्य रोगांमुळे नामशेष होत आहे. मेथी, कोथिंबीर, शापू अशा पालेभाज्या ही खराब झाल्या आहेत. त्यात हवामान खात्याने पुढील तीन चार दिवस पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
करडे, निमोणे परिसरात खरीप हंगामातील काढणीला आलेला कांदा पिकाचे, तरकारी भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. एकरी पन्नास हजार रुपये खर्च करून ही बदललेल्या वातावरणामुळे व पडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. या भागात तातडीने पंचनामा करणे गरजेचे आहे.
- संतोष लंघे, सरपंच चव्हाणवाडी, (ता. शिरूर)
खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचा व फळपिकांचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने कामही सुरू झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गावांतील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना आपल्या नुकसानीची कल्पना द्यावी. पंचनाम्यापासून कुठलाही शेतकरी वंचित ठेवणार नाही.
- सुवर्णा आदक. शिरूर कृषी अधिकारी
00262
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.