उजनी धरणातून सव्वा लाख क्यूसेकचा विसर्ग
इंदापूर, ता.२९ : गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वाढत असलेल्या पाणी पातळी आणि उजनी धरणाने यापूर्वीच शंभरी पार करीत धोकादायक पातळी गाठत आल्याने धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करीत सोमवार (ता.२९) रोजी १ लाख २५ हजारहून अधिक क्युसेक्स करण्यात आला. यामुळे भीमा नदीला पूर सदृश स्थिती निर्माण झाली असून नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्याबाबत आला.
उजनी धरणात सोमवारी सायंकाळी सहा वाजता १०० टक्के पेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये दौंड येथील सरीता मापन केंद्र या ठिकाणावरून सद्य ८४ हजार ८०२ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी टप्प्या टप्प्याने वाढ करत १ लाख २५ हजार करण्यात आला तसेच विद्युत गृह १६०० क्यूसेक असा एकूण एक लाख २६ हजार ६०० क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे.
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढविला आहे. यामध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत तसेच योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
- एस.यू. डुंबरे, कार्यकारी अभियंता,उजनी धरण व्यवस्थापन विभाग,भीमानगर, सोलापूर.
06383
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.