भात रोपांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
जुन्नर, ता.२६: अतिवृष्टीमुळे जुन्नरच्या आदिवासी भागातील भात रोपांचे नुकसान झाले झाले आहे. यामुळे भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जुन्नर तालुका आदिवासी आजी-माजी सरपंच महासंघाच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
संघटनेचे अध्यक्ष पोपट रावते म्हणाले की, ता.१८ व १९ जून रोजी आदिवासी भागात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे प्रामुख्याने आदिवासी भागातील घाटघर, देवळे, जळवंडी, पूर, शिरोली, फांगुळगव्हाण, निमगिरी, कुकडेश्वर, खुबी, तळेरान, भिवाडे, खिरेश्वर, तळमाचीवाडी, आंबोली, भिवाडे, तळमाचीवाडी आदी गावातील भात रोपे पिवळी पडली आहेत. मूळकूज झाल्याने लागवडी योग्य राहिली नाहीत.
भात लागवडीसाठी आवश्यक रोपे उपलब्ध होणार नसल्याने आदिवासी शेतकरी चिंतेत पडला आहे. भात उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.
महसूल व कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत तसेच नुकसान भरपाई मिळावी, अशी संघटनेने मागणी केली आहे.
08706
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.