कानगावात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक
कानगाव, ता.२२ : कानगाव (ता.दौंड) येथील शेतकऱ्यांनी शेतकरी आक्रोश कृती समिती स्थापन करून सुरू केलेल्या धरणे आंदोलनाचा सोमवारी (ता.२२) पाचवा दिवस होता. शेतकऱ्यांनी अर्धं नग्न होत घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला.
कांद्याला ३५ रुपये हमीभाव मिळवा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी तसेच इतर मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कष्टकरी शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला बाजारभाव नाही व पावसाने कहर केला आहे. त्याचप्रमाणे वखारीतील कांदा खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून शेतकरी आता आक्रमक झाला आहे. कारण शासनाचे लक्ष शेतकऱ्यांकडे नाही, आरोप शेतकरी करीत आहेत .ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीमालाच्या बाजारभावावर अवलंबून असते. शेतीला बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना मुलांची शिक्षणाची फी, कर्ज, दवाखाना खर्च व शेतीसाठी नवीन भांडवलासाठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आर्थिक आणीबाणी तयार झाली आहे.यासाठी शासनाने त्वरित योग्य पावले उचलली नाही तर शेतकऱ्यांच्यात आक्रोश होऊन राज्यव्यापी मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
दरम्यान, आज झालेल्या आंदोलनामध्ये भानुदास शिंदे, रामदास पवार, दादासाहेब गवळी, नानासाहेब नलवडे, नानासाहेब कोऱ्हाळे, राजेंद्र मोरे, संतोष गायकवाड, सुरेश फडके, किसन चौधरी, नानासाहेब फडके,दुर्गादास मुळीक, राजेंद्र कोंडे, दत्तात्रेय मोरे, मच्छिंद्र गवळी, बाळू गवळी,मारुती कोंडे इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00629
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.