कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवा : कुल
केडगाव, ता. २८ : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा सुरू असताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यात उसाची व शेतीची चांगली परिस्थिती असताना कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून, याबाबत राज्य व केंद्र सरकारने एकत्रितपणे निर्णय घेतल्यास तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणार आहे. याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.