बारामतीच्या पश्र्चिम भागास अवकाळीने संजीवनी
मोरगाव, ता. १४ : बारामतीच्या पश्चिम भागात आठ दिवसांत दोन वेळा झालेल्या अवकाळी पाऊस पडला. यामुळे कोरड्या पडलेल्या आणि तहानलेल्या या भागास संजीवनी मिळाली आहे.
एकीकडे वाढत चाललेली उन्हाची प्रखरता आणि दुसरीकडे पाण्याच्या टंचाईमुळे जळण्याच्या मार्गावर असणारी उन्हाळी हंगामातील पिके या अवकाळी पावसाने तारली आहेत.
गेली काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि उन्हाची प्रखरता यामुळे नागरिक हैराण झाले होते. शेतकरी वर्गासह सर्व व्यावसायिक यांचे नियमितचे जनजीवन विस्कळित झाले होते. सार्वजनिक ठिकाणचे पाणवठे कोरडे पडल्यामुळे वन्यप्राणी यांचीही पाण्यासाठी वणवण होत होती .
सध्या या भागात विहिरींची पाण्याची पातळी खालावली आहे. शिवाय पाण्याची टंचाई सुरू झाली होती. गारांसह या भागात नुकताच झालेल्या अवकाळी पावसाने ऊस, कडवळ, चारा पिके यासह उन्हाळी इतर पिके तारली आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे बारामती जिरायत भाग पाणी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत भापकर, मासाळवाडीचे सरपंच मुरलीधर ठोंबरे, माऊली भापकर, भगवान धायगुडे, भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले.
नागरिक, पशुधन यांना गारव्यामुळे थंडावा
हवेत आल्हाददायक थंडावा निर्माण झाल्याने नागरिक सुखावले आहेत. मासाळवाडी येथे सोमवारी १३ मे रोजी ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे काही नुकसान झाले नाही मात्र, उष्णता व उन्हाची प्रखरता याने त्रस्त झालेले नागरिक व पशुधन यांना वातावरणातील गारव्यामुळे सुखद थंडावा मिळाला.
02837
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.