कऱ्हेवरील बंधारे भरल्यामुळे शेतकऱ्यांना आधार
मोरगाव, ता. १३ ः नाझरे (ता. बारामती) पाटबंधारे विभागाने कऱ्हा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे अडविल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी आधार मिळाला आहे. हे सहा बंधारे पूर्ण क्षमतेने अडविले असल्याची माहिती शाखा अभियंता गणेश गायकवाड यांनी दिली.
नाझरे जलाशय शंभर टक्के भरल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणीसाठ्यातून तरडोली पाझर तलाव व मोरगाव परिसरातील छोटे पाझर तलाव भरण्यात आले. तर, दुसरीकडे कऱ्हा नदीत पाणी सोडण्यात आले. दोन महिने नदी प्रवाहित असूनही पाटबंधारे विभागाने नियमानुसार, १५ ऑक्टोबरनंतर बंधारे अडविण्याचे काम सुरू केले होते.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात परतीचा अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, आंबी परिसरातील रब्बी हंगामाची पिके धोक्यात आली होती. पावसाचे पाणी व कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांचे पाणी याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उपलब्ध नाही. मात्र, नाझरे पाटंबधारे विभागाने योग्य नियोजन करून आंबी बुद्रुक अंतर्गत जगतापवस्ती, माळवाडी, मोरगाव, तरडोली, साळोबाडोह, ढोपरेमळा येथील बंधाऱ्यांचे ढापे वेळेत बसवून पाणी अडविले आहे. मोरगावमध्ये ३५ दशलक्ष घनफुट तर इतर पाच बंधाऱ्यात २० दशलक्ष घनफुट पाणीसाठा साठले असून अडीचशे ते तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
पूर्वी शेतकरीच जीव धोक्यात घालून कऱ्हेवदील बंधारे अडवित होते. मात्र, नाझरे पाटबंधारे विभागाकडे हस्तांतर झाल्यापासून विभाग बंधारे अडविण्याचे काम दरवर्षी योग्य नियोजन करून करतो आहे. बंधारे वेळेत अडविल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. वास्तविक, रब्बी हंगामासोबतच अप्रत्यक्षरित्या उन्हाळी हंगामात या पाण्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

