वेळवंड खोऱ्यामध्ये भात पिकावर करपा
महुडे, ता.२० : भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यांमध्ये भात पिकावर करपा, तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भात शेती धोक्यात आली आहे. कृषी विभागामार्फत भात पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
भाटघर जलाशयाच्या किनाऱ्या लगत असलेल्या वेळवंड खोऱ्यातील राजघर, वेळवंड, पांगारी, जयतपाड, नानावळे, नांदघुर, कोंडगाव, डेहेण, सांगवी, साळुंगण आदी परिसरात वर्षभरात भात हेच पीक घेतले जाते. याच पिकावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो.मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेती संकटात सापडल्याचे चित्र असतानाच यंदा भात पोसणीच्या अवस्थेत असताना हवामानातील बदलामुळे भात पिकांना करपा, तांबेरा व खोड किडीने ग्रासले आहे. रोपे तांबडी, पिवळी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन भात पिकाची पाहणी करून पंचनामे करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वेळवंड विकास सोसायटी अध्यक्ष पंढरीनाथ राजीवडे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
02532
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.