विहिरीत टाकल्या मेलेल्या कोंबड्या
नसरापूर, ता. २५ : केळवडे (ता. भोर) येथील शेतकरी लक्ष्मण सोपान कोंडे यांच्या शेतातील विहीरीतील पाण्यात अज्ञात व्यक्तीने मृत कोंबड्या भरलेली तीन ते चार पोती टाकल्याने संपुर्ण विहीरीचे पाणी दुषित झाले असुन शेतकरी कोंडे यांनी राजगड पोलिस ठाण्यात याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे.
शेतकरी लक्ष्मण कोंडे यांच्या गट नं. ३७१ शेतातील विहीरीत या मृत कोंबड्या टाकल्या आहेत. कोंडे या विहीरीचे पाणी शेतीसाठी व त्यांच्या घरात वापरण्यासाठी तसेच गोठ्यातील गुरांना पाजण्यासाठी वापरतात बुधवारी (ता. २४) पहाटे घरातील पाण्याची टाकी भरण्यासाठी ते घरापासून जवळच असलेल्या या विहीरीवर गेले असता त्यांना पाण्यातून दुर्गंधी आली. त्यांनी पाण्यात पाहीले असता पाण्यामध्ये मृत कोंबड्या भरलेली प्लास्टिकची पोती टाकलेली दिसली. तीन ते चार पोत्यांमध्ये मृत कोंबड्या भरल्या होत्या. यामुळे पाणी दुषित झाल्याने त्यांना घरासाठी तसेच गोठ्यातील गुरांसाठी पाणी वापरता आले नाही.
कोणीतरी मुद्दाम हे कृत्य केल्याचे लक्षात आल्यावर कोंडे यांनी याबाबत राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. या बाबत राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी मयुर राणे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.