शेतकरी संघटनेचे उद्या राज्यव्यापी धरणे आंदोलन
नसरापूर, ता.२७ : ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना सोमवारी (ता. २९) राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे यांनी सांगितले आहे.
शेतकरी संघटना तहसील कार्यालयासमोर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत धरणे आंदोलने होणार आहे. आंदोलनाद्वारे शासनासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात येणार आहेत. याबाबत रांजणे यांनी सांगितले कि, यंदा शेतकरी सर्व बाजूने अडचणीत आला आहे. पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. फळबागा, भाजीपाला पिकांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. सध्या शेतकऱ्यांवर सुलतानी आणि अस्मानी, असे दुहेरी संकट आले आहे.
दरम्यान, यावेळी भोर तालुकाध्यक्ष प्रकाश बढे, युवा आघाडी प्रमुख दिलीप भोरडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.