पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे ः परदेशी
न्हावरे, ता. ११ ः ‘‘प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात सध्या सर्वत्र प्रदूषण वाढत चालले आहे. त्याचा मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. यासाठी सर्वत्र सामाजिक पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करणे व त्याची जपणूक करणे यासाठी चळवळ उभी करावी लागणार असल्याचे मत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे कार्याध्यक्ष व्याख्याते प्रा. संतोष परदेशी यांनी व्यक्त केले.
न्हावरे (ता. शिरूर) येथील श्री. मल्लिकार्जुन विद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक बाबूराव घोलप राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहळ यांच्या स्मृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘सध्याचे वाढते प्रदूषण रोखणे ही काळाची गरज’ याविषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बाळासाहेब भालेराव हे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. स्वागत प्रा. राजेंद्र बळीनवर यांनी केले. तर आभार प्रा. संजय गायकवाड यांनी मानले.
.

