पाणी ओसरल्याने गणेशवाडी पूल वाहतुकीस खुला

पाणी ओसरल्याने गणेशवाडी पूल वाहतुकीस खुला

Published on

नीरा नरसिंहपूर, ता.१६ : उजनी धरण नियंत्रण विभागाने उजनी धरणातून भीमा नदीतील ३५ हजार क्यूसेक विसर्ग कमी करून मंगळवारी (ता.१६) ६५ हजार क्यूसेक करण्यात आला. यामुळे भीमा नदीवरील तीन बंधाऱ्यांवरील पाणी कमी होऊ लागले आहे. गणेशवाडी पुलावरील पाणी कमी झाल्याने पूल वाहतूक दुपारपासून सुरू करण्यात आली.

पाऊस अद्यापही सुरू असल्याने विसर्ग कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे नदी काठावरील इंदापूर, माढा तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. उजनी परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणाचा साठ्यात मोठी वाढ होऊन १२२ टीएमसी झाला आहे. परंतु वरून येणाऱ्या पाण्यात वाढ झाल्यास व पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे उजनी धरण प्रशासनाने शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गणेशवाडी येथील पूल उघडा झाल्याने यावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. तर कोंढार पट्ट्यातील विद्यार्थ्यांसह शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. परंतु पाऊस अद्यापही सुरू असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा जलसंपदा विभाग सोलापूर, धरण नियंत्रण विभाग भीमानगर, धरण नियंत्रण विभाग नीरा खोरे - वीर धरण व उजनी पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

05050

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com