गणेशवाडी पुलावर दहा फूट पाणी

गणेशवाडी पुलावर दहा फूट पाणी

Published on

नीरा नरसिंहपूर, ता.२९ : उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने भीमा नदीवरील तीनही बंधारे सहाव्यांदा बुडाले. गणेशवाडी पुलावर दहा फूट पाणी वाहत असल्याने यावरील वाहतूक बंद झाली आहे.
पुलावरील वाहतूक सकाळी सहा वाजल्यापासून बंद झाली आहे. कोंढार पट्ट्यातील विद्यार्थ्यांना सोमवारी पुन्हा सुट्टी देण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा जलसंपदा विभाग सोलापूर, धरण नियंत्रण विभाग भीमानगर, धरण नियंत्रण विभाग नीरा खोरे - वीर धरण व उजनी पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, वीरमधून नीरा नदीत सात हजार ८०० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरील इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नरसिंहपूर येथील संगमावर एक लाख ३४ हजार क्युसेकचा विसर्ग वाहत आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत सतत कमी जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामध्ये आज वरील सर्व धरणातून एक लाखापेक्षा जास्तीचे पाणी उजनीत येत असल्याने उजनी धरणाच्या साठ्यात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पूरनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून भीमा नदीत आज सहाव्यांदा एक लाख २५ हजार क्यूसेकचा विसर्ग सोडला जात आहे. पावसाची परिस्थिती जर अशीच राहिली तर पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे उजनी धरण प्रशासनाने नदी काठावरील शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

05103

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com