धामणे पुलावरून वाहतूक सुरळीत
पाईट, ता. २९ : धामणे पुलावरून सोमवारी सकाळपासून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. यामुळे नोकरदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
भामा आसखेड धरणातून शनिवारपासून (ता. २७ ) सायंकाळपासून भामा नदीपात्रात सुमारे १३३१२ क्यूसेकने पाणी सोडले होते. त्यामुळे धामणे गावाच्या पुलावरून पाणी गेले होते. तसेच धामणे-तळशेत मार्गे चाकण एमआयडीसीकडे होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय झाली होती.
दरम्यान रविवारी (ता.२८) सायंकाळ सातपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने भामा आसखेड धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. असे कालवा निरीक्षक वसंत धोकरे यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून धामणे पुलावरून वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.